Monday, May 11, 2020

पोटल्याचा डोंगर आणि रायगडावरचा शेवटचा रणसंग्राम !

..
..........  आणि मी, म्हणजेच दुर्गदुर्गेश्वर, महाराजांच्या पावन स्पर्शाने गगनभरारी घेणारा मी, श्री रायगड, होरपळून गेलो..... तो दिवस म्हणजे 10 मे 1818....

आजवर मी अनेक सुख दुःखाचे क्षण अनुभवले होते.. पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणून नाम कमविले होते.. भर पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात न्हाऊन निघालेलो होतो, अमावस्येच्या काळोख्यात संग्रामात ऐतदारपणे झगडलो होतो.. ज्वालारसातून जन्मीलो होतो, एखाद्या बलदंड योद्ध्यासारखा बुलंदपणे उभा होतो.. 1662 साली रायरीचा श्री रायगड झालो होतो.. एका दशकानंतर स्वराज्याची राजधानी झालो होतो... 2 वर्षांनी स्वराज्य संस्थापक माझा पुत्र, ह्याचा राज्याभिषेक आनंदोत्सव बघितला होता, आणि तो दुःखद दिवसही अनुभवला होता जेव्हा काळाने 1680 साली घात केला होता.. माझ्या पोराला नेऊन मलाच पोरकं केलं होतं, माझा प्राण माझ्यापासून हिरावला होता..

आणि अखेर तो ही दिवस आला, अनेक वर्षे बुलंदपणे उभा राहिलेलो मी बऱ्याच प्रमाणात राखेत विरघळून गेलो..
इतिहासात आपण सर्वानी फितुरीची बरीच उदाहरणे पाहिली असतील. कोणी वतनासाठी, कोणी जहागिरदारीसाठी तर कोणी मोहरांसाठी फितूर झाले. अशीच एक फितुरी पोटल्याच्या डोंगराने देखील माझ्याबरोबर केली, पण त्यामागे काय कारण होते हे मात्र त्यालाच ठाऊक कि त्याचा नाईलाज होता. माझ्या दक्षिणेला असलेला पोटल्याचा डोंगर... कोणासाठी असशील अपराधी तू, कोणासाठी फिरंगी फितूर, पण माझ्यासाठी एक जिवलग सखाच जो दुरावूनही जवळ राहणारा...

इंग्रजांनी १ मे १८१८ या दिवशी माझ्यावर हल्ला चढवला..
कॅप्टन प्रॉथर हा नेतृत्व करीत होता. या वेळी माझा किल्लेदार होता अबुल फतेखान. आपलं सारं बळ एकवटून तो आपला भगवा झेंडा सांभाळत होता. माझी लेकरं, मराठे, इंग्रजांना इरेसरीने टक्कर देत होते. 6 मे 1818 रोजी दुसऱ्या बाजीरावाची पत्नी वाराणसीबाई हिने इंग्रजांसमोर तहाचे निशान फडकावले असतानाही कर्नल प्रॉथर व मेजर हॉल यांनी पोटल्याच्या डोंगरावरुन 10 मे 1818 पर्यंत तोफांचा भडिमार करुन माझ्या सर्व वास्तू अगदी बेचिराख करून टाकल्या व जमीनदोस्त केल्या. इंग्रजांची तोफाबंदुकांची आग, दारूगोळ्याचा प्रचंड स्फोट, मस्तकी वरून सूर्याची उन्हाळी आग, सगळीकडे आगच आग.
माझं, रायगड पाडावाचे वर्णन खुद्द प्रॉथर यानेच लिहून ठेवले आहे. तो म्हणतो, "मी जेव्हा रायगड ताब्यात घेण्यासाठी गडावर गेलो तेव्हा गोलकांच्या वर्षावाने भस्मसात झालेल्या इमारतीच्या फुफाट्याशेजारी ती (वाराणसीबाई) बसली होती. तिचे राहते घर धुमसत होते. पडवीवजा भागात आता तिचे वास्तव्य होते." कॅ. प्रॉथर वाराणसीबाईसाहेबांशी अदबीने आणि आदराने वागला. त्याने त्यांना मेण्यातून सन्मानपूर्वक पुण्याकडे रवाना केले. ब्रह्माावर्त येथे स्थानबद्ध असलेल्या श्रीमंत दुसऱ्या बाजीराव पेशव्यांकडे नंतर वाराणसीबाईंची इंग्रजांनी रवानगी केली..

माझ्या उदरी उरली फक्त राख. सारे वाडे , राजसभा आणि होतं नव्हतं ते जळण्यासारखं सारं जळून गेलं. सर्वात धडाडून जळालं माझं रक्षण करण्याकरता दहा दिवस झुंजलेल्या अबुल फतेखानचं आणि मराठी सैनिकांचं काळीज. आणि मी, म्हणजेच दुर्गदुर्गेश्वर, महाराजांच्या पावन स्पर्शाने गगनभरारी घेणारा मी, श्री रायगड, होरपळून गेलो.....
हिरकणी बुरुज, नगारखाना, पालखी दरवाजा, वाघ दरवाजा, जगदीश्वर मंदिर, नाना दरवाजा, टकमक टोक, माझ्या साऱ्याच अंगांनी इतिहास अनुभवला होता आणि ह्याक्षणी तो डोळ्यापुढे तरळत होता, पण माझे अश्रू कमी पडले, ह्या आगीला विझविण्यासाठी ते कमी पडले..
त्याक्षणी मला आठवले #कविराज #भूषण ह्यांनी माझ्या सौंदर्याला पाहून केलेले वर्णन...

 *दच्छिन के सब दुग्ग जिति दुग्ग सहार विलास।
सिवसेवक सिव गढपती कियो रायगड वास।।
जापर साहि तने सिवराज सुरेस की ऐसी सभा सुभ साजे।
यों कबिभूषन जंपत हे लखि संपति को अलकापति लाजे।।
जी मधि तिनहू लोक की दीपति ऐसी बडो गढराज विराजे।
वारि पताल सी माची मही अमरावति की छबी उपर छाजे।।
मनिमय महल सिवराज के इमि रायगड में राजही।
लखि जच्छ किन्नर असुर सुर गंधर्व हांसनि साजही।।*

अर्थ- ((..... शिवरायांनी सर्व किल्ल्यांचा आधार व विलासस्थान अशा रायगड किल्यास आपले वसतिस्थान केले. या किल्ल्यावरील शिवाजीचा दरबार व तेथील ऐश्वर्य पाहून कुबेर लाजू लागला हा. किल्ला एवढा प्रचंड आणि विशाल आहे, की त्यात तीनही लोकींचे वैभव साठविले आहे. किल्ल्याखाली भूभाग जलमय पाताळाप्रमाणे, माची म्हणजे पायथ्याचा उंचवट्याचा भाग पृथ्वीप्रमाणे व वरील प्रदेश इंद्रपुरीप्रमाणे शोभतो. रायगडावर शिवरायांचे रत्नखचित महाल शोभत आहेत.
रायगडावरील शिवरायांचे रत्नखचित महाल असे शोभत आहेत की त्यास पाहून यक्ष, किन्नर, सुर, असुर, गंधर्व हेदेखील ईर्षेने तसे महाल बनवू लागले..))

कविराज भूषणह्यांचे शब्द तरळत होते, मनोमनी अश्रू कोसळले.. पण पुन्हा एकदा दुर्गदुर्गेश्वर म्हणून मी उभा राहिलो... माझ्या लेकराचा, महाराजांचा, स्वराज्याचा सारथी म्हणून, इतिहास जपण्यासाठी, अभंग, निश्चल, स्वतंत्र उभा राहण्यासाठी.. माझे व इतर सह्यकडांचे भूषण गौरवशाली इतिहास माझ्या इतर लेकरांपर्यंत, तुमच्यासारख्या शिवभक्तांपर्यंत पोहचवण्यासाठी.. सक्षम..मी दुरदुर्गेश्वर, पूर्वेकडील जिब्राल्टर, श्रीमत किल्ले रायगड!!

जय शिवराय🙏🚩🚩
#दुर्गराष्ट्रसेवा हीच #शिवआज्ञा🚩
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2655443421407324&id=2317767855174884

नम्रता खैरे

संदर्भ:
*राजधानी रायगड, महाराष्ट्र शासन पुस्तिका
*आजवर वाचण्यात आलेली पुस्तकं, लेख
*इंटरनेट

छायाचित्र: पोटल्याचा डोंगर
#पोटल्याचा_डोंगर #रायगड #इंग्रज #10मे1818 #शिवाजीमहाराज

Sunday, April 12, 2020

Regret


The seeds of regret sowed in soil
The more i water the more it grew
The more it grew i Realize its a weed
Useless, unstoppable grows magnificently the more i feed

So i decide to let it be
Accept the situation and be happy and glee
Now the seeds turns to a plant
Bearing the sweet fruits and a new me
The more i water it grows to a big tree.

Waiting

Longing to wait
Waiting for longing
Wait for waiting
Longing Awaiting
Waiting that's eternal
Longing unconditional
Surpassing the physical
Waiting invincible
To wait is the key
For the longing to set free..

Longing


A longing to be
A longing not to be
A longing that's getting intense
A longing that's making me lose my sense
A longing thats making me aware
A longing that was never there
A longing whose roots are going deep
A longing that i behold and above all i keep
Hurting me, struggling me, a feeling
that the longing is giving
Difficult to express what its doing
Making me restless yet aware i am
Making me frustrate yet calm i am
A longing that needs to be
To unwind the truths
To dissolve the me
A longing hope not to be long
A longing hope not to be long

Monday, March 30, 2020

महाराजांचा शिवराज्याभिषेक

आज ज्येष्ठ मास शुक्ल त्रयोदशी.. आजच्या दिवशी महाराज छत्रपती झाले.. गोर-गरीबांसाठी, बाल स्त्रियांसाठी जुलमी अत्याचार करणाऱ्या यावनांपासून रक्षण करणारे कैवारी झाले, रक्षण करणारे छत्र झाले.. कसा असेल ना तो दिवस....
 'अजि सोनियाचा दिनु वर्षे अमृताचा घनु' असंच काहीतरी तो बलाढ्य श्री रायगड अनुभवत असेल ना.. आनंदाच्या दोही आनंद तरंग असंच त्या निळ्याभोर नभापरी उमटलं असेल ना... प्रत्येक बुरुज, तटबंदी, महाद्वार, चोरवाट, गडाच्या भिंतींनी झेललेले टोफ्यांचे मार, शस्त्रास्त्रांचे वार, ती जखम आज भरून निघाली असेल ना....
ह्या दिवसाची वाट जणू प्रत्येकाने पाहिली असणार....

महाराजांचा राज्याभिषेक दोन टप्प्यात पार पडला आधी घरातल्या नातलग व मंत्रिमंडळां समवेत गडाचा आतल्या दालनात अभिषेक झाला आणि मग प्रजेदेखत सिंहासनारोहण.....
 'पंचामृतंस्नानं समर्पयामि।'असे म्हणताना दूध, दही, मधु, घृत, शर्करा हे पाच अमृत पण त्यांचे गुण विसरून राजांच्या कोमलतेत, सद्गुणात, सामर्थ्यात, स्नेहभावात आणि मधुरतेत विलीन झाले असतील ना...
 "गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती
 नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु।।”
हे म्हणताना महाराजांच्या मस्तकावरून जेव्हा सप्तनद्या घळघळले असणार तेव्हा गोदावरीला ह्या पावन भूमीत जन्मल्याचा आनंद हेवा वाटला असणारच पण इतर नद्यांना जुलमी मुघल साम्राज्यापासून काही काळ वाचून महाराजांच्या मस्तकावरून वाहताना, अंगाखांद्यावर बागडताना, पायाशी नतमस्तक होताना किती तृप्त वाटलं असेल ना अगदी माहेरात आल्यासारखं, गगनात आनंद मावेनासा.....
 मंत्र तंत्र यंत्र युक्त असा अभिषेक सोहळा पार पाडून वस्त्रे अलंकार धारण करून, देवघरात कुलदेवतेला नमस्कार करून आई जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन सिंहासनारोहण विधीसाठी महाराज राज्यसभेकडे जायला निघाले..

 महाराज सिंहासनारोहण होण्यासाठी सज्ज.. महाराज पूर्वेकडे तोंड करून उभे आहेत..... हळूहळू सूर्यही त्याच्या छटा पसरवत होता पण त्याने त्याचे तेज आज महाराजांना दिले होते... अशावेळी कट्यार काळजात घुसली ह्यात शंकर महादेवन यांनी गायलेलं एक गाणं आठवतं....
" तेजोनिधी लोहगोल, भास्कर हे गगनराज
दिव्य तुझ्या तेजाने झगमगले भुवन आज
हे दिनमणी व्योमराज, भास्कर हे गगनराज।।

कोटी कोटी किरण तुझे अनलशरा उधळिती
अमृतकण परि होऊन अणुरेणु उजळिती
तेजातच जनन-मरण, तेजातच नवीन साज
हे दिनमणी व्योमराज"

महाराजांचे हे चित्र डोळ्यासमोर आणा.. त्या तेजापुढे आपले हातही जोडले जात आहेत.. नकळत नतमस्तक होणारे आपण आणि डोळ्यातुन ओघळणारे अश्रू........

महाराज पूर्वेकडे तोंड करून उभे आहेत..  समोर दूरवर दोन लेकरांचे, गडांचे कळस दिसत आहेत- श्री राजगड व श्री तोरणा...त्यांना पाहून महाराजांच्या डोळ्यासमोर संपूर्ण इतिहास उभा ठाकला असावा... मूठभर मावळ्यांसमवेत हिंदवी स्वराज्याची घेतलेली शपथ ते आता बलाढय साम्राज्य, आग्र्याला झालेला अवमान, अवघ्या नऊ वर्षाच्या शंभू बरोबर मृत्यूपासून सर्व  मावळ्यांसोबत केलेली सुटका, पुरंदर तह, उंचपुऱ्या बलदंड अफजलखानाचा वध, पन्हाळगडाचा वेढा, खडा पहारा असताना जोखमीचे काम हातात घेऊन स्वतः लाल महालात शिरणे, सर्व इतिहास त्या लेकरांकडे बघून महाराजांच्या डोळ्यांसमोरून सरकत असेल ना...
अशावेळी महाराजांना स्वराज्य संकल्पक आबासाहेब शाहाजी महाराजांची, संभा दादाची, तानाजीची, बाजी प्रभूंची किती आठवण आली असेल ना..
महाराणी सईबाई जेव्हा शेवटच्या घटका मोजत होत्या तेव्हा त्यांनी महाराजांना शंभू बरोबर तिच्या दुसऱ्या लेकराचं ही रक्षण करायचं, बापाबरोबर आईचं प्रेम,जिव्हाळा देण्याचं वचन मागितलं होतं,
आज तो दुसरा लेक म्हणजे हे हिंदवी स्वराज्य त्याचं छत्रपती होताना महाराजांना महाराणी सईबाईंच्या वचनाचं सार्थक केल्यासारखं वाटत असेल ना..
मृत्यूपासून अनेक वेळा परतलेले महाराज आज छत्रपती होत आहेत, अंगावर शहारे उभारत आहे.. यमराज ही चित्रगुप्ताला आसवे लपवून अभिमानाने सांगत असेल मी हा तेजापुढे झुकलो...
 मृत्यू पासून रक्षण त्या जिजाऊ माऊलींमुळेच, त्यांच्या संस्कारांमुळेच झाले..

"विद्यागुरुहुनि थोर आदर्श मातेचे उपकार।
गर्भापासोनि तिचे संस्कार बालकांवरि।।"
त्या माऊलीला आज तिचे जीवन सार्थक झाले असेल असंच वाटत असेल ना, त्या माऊलीचा ऊर भरून आला असेल ना...
'याजसाठीं केला होता अट्टहास।' असे तिला वाटत असेल ना....
ह्या क्षणी महाराजांच्या मनात हा श्लोक घोळत असेल..
आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम्।
सर्वदेवनमस्कार: मातरं प्रति गच्छति ||

हे सर्व महाराजांच्या मनात चालू असेल पण त्यांना अश्रू लपवावे लागत होते कारण ते आता छत्रपती होते..
काही थेंब अश्रू ओघळत होते पण एका हातात सोन्याची विष्णूची मूर्ती व दुसऱ्या हातात धनुष्य असताना आसवे पुसता येत नव्हते, अशावेळी ना जिजाऊ माऊलींच्या कुशीत शिरून घडाघडा रडता येत होते.... नकळत काही अश्रू त्या सिंहासनाच्या पायऱ्यांवर पडले, तृप्त झाले..

विचारांचा थैमान थांबवला गागाभट्टांच्या शब्दांनी- "महाराज सिंहासनावर आरुढ व्हा"।।
आणि महाराज सिंहासनावर आरुढ झाले, एकच जयघोष झाला.........
"क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधिश्वर छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय.....
पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणणारी ही रायगड नगरी, ह्या जयजयकाराने दुमदुमली असणार.. सह्याद्रीचे कडेपठार, गडकोट किल्ले नतमस्तक झाले असणार, वारा सुगंधी मंद वाहत असणार, झाडं पानं फुलं डुलत असणार
वाद्य, तोफांचा निनाद घुमघुमत असणार.. भगवे झेंडे ह्या जयघोषाने उंच उंच फडकले असणार.. बाजूला विसावा घेणारी जगदंबा तलवार ह्या आपल्या जाणता राजाच्या छत्रपतींच्या पावन हातात यवनांचा खातमा करण्यासाठी अजून हिरहिरीने सज्ज झाली असणार..
अखेर हा स्वराज्य संस्थापक छत्रपती झाला.. हत्तीवर आरुढ होऊन मिरवणूक निघाली, जगदीश्वराच्या दर्शनाला, शिवाची भेट शिवाला.. फुले, अक्षता, चुरमुरे, बिल्वपत्र, तुळशीपत्र, लाह्या, बत्ताशे साऱ्यांची मंगलवृष्टी होत होती.. मिरवणूक निघाली....
रामराज्य स्थापिले, संपूर्ण रायगड भूमी दिवळीसम झगमगत होती कारण महाराज छत्रपती झाले..
"तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर, त्यौं मलिच्छ बंस पर, सेर शिवराज हैं॥"
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो।।

Wednesday, November 01, 2017

तुम आने से पहले

तुम आने से पहले.....


तुम आने से पहले
चारों ओर अंधेरा सा था
ना कोई मंजिल ना रास्ता था
डर लग रहा था
कही लड़खड़ा न जाऊ
दर्द के इस घने अंधेरे में
कही घूम ना जाऊ
पर तुम आए रोशनी बनकर
प्यार भरा मौसम लेकर

तुम आने से पहले
आँखें दोनो सुक गई थी
सासें कहीं फूल गई थी
डर लग रहा था
कही डूब ना जाऊ
आसुओं के इस बाढ़ में
पर तुम आए किनारा बनकर
प्यार भरा मौसम लेकर

तुम आने से पहले
मन कही भटक गया था
दिल कही अटक गया था
डर लग रहा था
कही खो न जाउ
तपते रेगिस्तान में
कही जल ना जाउ
पर तुम आए बादल बनकर
प्यार भरा मौसम लेकर

तुम आने से पहले
जिंदगी बेरंग हुई थी
ना कोई हँसी, ना खुशी थी
डर लग रहा था
कही भावना दब न जाए
बेजान जिंदगी से
कही संवेदना खत्म ना हो जाए
पर तुम आए इंद्रधनुष बनकर
प्यार भरा मौसम लेकर

तुम आने से पहले
जीवन के राह में फिसल गई थी
दुख, दर्द में मसल गई थी
डर लग रहा था
कही डगमगा ना जाउ
दलदल के इस विशाल जाल में
कही फस ना जाउ
पर तुम आए सहारा बनकर
प्यार भरा मौसम लेकर

तुम आने से पहले
दुनिया से मैं छुप रही थी
खुदसे मैं भाग रही थी
डर लग रहा था
कही खुदको गवा ना दू
खुदके चेहरे से डरकर
आत्मसम्मान को ठेच पहुंचा न दू
पर तुम आए आयना बनकर
प्यार भरा मौसम लेकर