Saturday, August 19, 2017

आज़ादी

आज वो आज़ादी का जशन मना लेते है
हम आज भी उन यादों में कैद रहते है

उन्हें ये दिन, ये तारीख याद नही रहती
हम ये दिन, ये तारीख भूल नही पाते

उनके चेहरे पर खुशी की हँसी होती है
हमारे चेहरे पर दुख भरी मुस्कान होती है

वो खूब जी लेते है ये दिन, हर दिन
हम खूब रो लेते है ये दिन, हर दिन

वो सारे हसीन पलों को इतनी आसानी से भूल लेते है
हम आज भी उन्ही पलों को अक्सर जी लेते है,
उनसे आशियाना सजा लेते है.....

हम आज भी उन यादों में डूबे रहते है, कैद रहते है
और वो आज खुशी का माहौल बना लेते है, आज़ादी का जशन मना लेते है,
आज़ादी का जशन मना लेते है........

------  नम्रता



Friday, August 18, 2017

Blue Whale Game

         Everyday we are hearing cases of suicides by teenagers, addicted to #bluewhalegame.. Just tried what would be one of the reasons for a 15 year boy to end up his life..
                 ----- Namrata Khaire
       
          " Mummy, papa , I am sorry..  पण मला हे करावं लागेल. मी सुरू केलेला हा खेळ मला संपवावा लागेल.. ते बघत आहेत मला मम्मा, I am  sorry.. I am really sorry....
           पण माझी पण चूक नाही मम्मा, तुम्ही दोघं ऑफिस मधे जायचा, संध्याकाळी यायचा. मी शाळेतून यायचो दुपारी, खरंतर घरी यायला नकोसं वाटायचं. भीती वाटायची, कसं तरी व्हायचं..
म्हणून काहीना काही करत मी उशिरा घरी यायचो.. कधी मित्रांबरोबर खेळायचो, कधी बाईंना पुस्तकं लावायला मदत करायचो, कधी नाक्यावरच्या बसस्टॉप वर नुसतंच बसायचो, कधी झाडाची पाने तोडून काहीतरी सजवायचो, तर कधी फक्त रस्यावरचे दगड गोळा करायचो..
भर उन्हात पाठीवर इतकं ओझं उचलून जमेल तिथे हिंडायचो, बागडायचो, फिरायचो. पण पाय थकले की घरी यायचो.....
      
            घरी कुणीच नसायचं.. खूप शांतता असायची.. मी काही बोललो की माझाच आवाज घुमायचा.. असं वाटायचं कुणी आहे, खूप वाटायची गं मम्मा....
असं वाटायचं की ती शांतता मला खाऊन टाकेल आणि तो आवाजही मला दाबून टाकेल..
मला तुमची खूप आठवण यायची, गरज वाटायची.. मी डॅडू ला फोन लावायचो, पण मिटिंग बिटिंग मध्ये असायचो तो.. तू पण फोन नाही उचलायचीस, उचललास तर काम आहे सांगायचीस.. बाईंनी इतका सारा दिलेला होमवर्क करून घ्यायला पण तुम्ही नसायचा..
     शाळेला पण आम्ही रोबोट वाटतो का ग? Project book , class book, home book, text book, एका subject चे किती books.. सगळं उचलायचं एवढुश्या बॅग मध्ये, आम्ही पण एवढूसे, आणि जायचं शाळेत.. प्रत्येक subject चा किती होमवर्क, नाही केला तर punishment, टीचर किती बोलायची, रागवायची, मारायची.... मला नाही जायचं शाळेत..
       त्या दिवशी मी computer चालू केला. असंच काहीतरी search करताना मला Blue Whale game दिसला. pokemon Go सारखाच interesting आणि नवीन वाटला.. खेळलो काही दिवस.  Curiosity वाढली, ते नाही का म्हणत, virtual काय, reality काय तसं काहीतरी होतं.. रोज काय challenge असेल, ह्याची curiosity वाढत गेली, म्हणून शाळा सुटली की लगेच पळत घरी यायचो.. adventurous वाटत होतं सगळं.. शाळेपासून, भीतीपासून एकदम tension free वाटत होतं.....
     एक दिवशी तो blue whale मासा हातावर काढायचा होता. पेन्सिल पेन ने नाही, तर चाकू, blade सारख्या एखाद्या धारधार वस्तूने..  मला नव्हतं करायचं तसं, पण ते game वाले बघतात, आणि game असा मधेच सोडता येत नाही ना, म्हणून कसंतरी केलं, mumma, daddu, खूप दुखलं तेव्हा, खूप रक्त आलं, खूप रडलो मी.....
           पण mummy, daddy तुमचं लक्ष नाही गेलं का हो माझ्या हातावर? इतके busy कसे हो तुम्ही? मी दिवसभर काय करतो, इंटरनेट वर काय बघतो, शाळेत जातो का, test मध्ये किती marks आणतो, अभ्यास करतो की copy करून पास होतो हे कधी पाहिलंत का? खेळतो का, खेळताना मला कुठे लागतं का, दुखतं का, एवढा होमवर्क  मी कसा करतो कधीतरी बघा ना..
        Next year तर माझी दहावी आहे, कोणत्या क्लास ला पाठवायचं, 85 % च्या वर आणायचं, नंतर science आणि मग engineering ला पाठवायचं हे सगळं तुम्ही आधीच ठरवलं. पण क्लास ला जाऊन मला 85-90% मिळणार का? तुम्ही पण थोडंसं लक्ष द्या ना.. थोडासा time द्या ना......
एखादी सुट्टी घेऊन कधी बागेत फिरायला जाऊया, कधी एकत्र पाणी पुरी खाऊया, कधीतरी मज्जा पण करूया ना..
मला नकोय pokemon ची बॅग, chota bheem ची bottle, किंवा ती remote control car,  computer नको, इतका मोठा TV पण नको आणि हा game पण नको.. मला फक्त तुम्ही हवे आहात.. फक्त तुम्ही...


       आज Game चा last day आहे.. मला नाही खेळायचाय game, पण मला भीती वाटतेय त्यांची.. ते बघत आहेत मला, ते बघत आहेत..
मला game संपवावाच लागेल.. त्यासाठी मला स्वतःला संपवावं लागेल. I am sorry mummy, I  am sorry daddy..... I am sorry ...... love you both
तुमचाच........ 





Tanhayee

         रोज सोचते है, ठान लेते है दफन कर देंगे उस प्यार को... पर अकसर सच्ची आशिकी इतनी आसानी से भूली नहीं जाती..

         वो रोज यादों में आते है, ख्वाबों का आशियाना सजाते है, और हम रोज तडपते है....
          आँखे अकसर नम हो जाती है, दिल अकसर रो लेता है.. बडा जालीम बरताव करते है वो और हम फिर भी बेशरम की तरह उमीद रखते है, उनका इंतजार करते है.. यही मानकर, यही समझकर के फिर एक उजाला होगा, सूरज की किरणो से फिर अंधकार दूर होगा, फिर चिडियो की गुंज सूनने आएगी, फिर उनसे हमनवा होगी....

           कैसे उनको भूल जाए, कैसे हम उन यादो को मिटा पाए, कैसे इस नादान दिल को समझाए के वो ऐसे ही है......
          कर लेते है हम दिल्लगी, वो दिल तोडना ही जानते.. कर लेते है हम इझहार, प्यार.... वो कर देते है इन्कार...
हम ना करे कोई बेवफाई.. वो छोड देते है हमे अकेले.. फिर बस हम और हमारी तन्हाई.. बस हम और हमारी तन्हाई.... 😢



------  नम्रता खैरे

Wednesday, August 16, 2017


       कालच समजलं मानसिंग दादाने रात्री पत्र उशीजवळ ठेवलेलं आणि भर रात्री ते पत्र उंबरठ्या बाहेर पडलं. कदाचित आठवणींत गुंतलेलं, म्हणूनच अक्षरांना, वाक्यांना दुःख समजलं, ते गहिवरलं आणि ते निघालं......
      निरव शांतता, भयाण वाटणारा काळोख असला तरीही  रात्री एकटंच, आपली वाट शोधत, मजकूर योग्य त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायला, एकटंच निघालं की....

       आणि जे नेहमी घडतं तेच घडलं. आपण निघतो काम फत्ते करण्याच्या उद्देशाने पण कोणाला माहीत असतं नियतीने काय वाढून ठेवलंय पुढे.. सुख, दुःख, अनुभव, अनेक समस्या, अनेक परीक्षा ह्या जणू कमरेवर हात ठेवून तयारीनिशी पुढे उभ्या असतात.. पण ह्यावर मात केली, निभावलो तर सुख, नावलौकिक, गगनात न मावणारा असा आनंद.... पण हरलो, खचलो तर दुःखाचा डोंगर, डळमळीत आत्मविश्वास, आणि भूतकाळाच्या दलदलीत स्वतःला कोसत अगदी फसणं.... नियती परीक्षा ही पाहणारच, पण खचून न जाता त्यातून शिकणं, शहाणं होणं महत्वाचं....

         पत्राला अडचणी आल्या तसं काहीसं आपलं पण होतं ना.. आपल्याला पण अनेक अडचणी येतात। कधी घातक मित्ररूपी दवबिंदू त्यांचा शिडकावा करतात तर कधी आपले अस्तित्व मिटवण्यासाठी वादळ रुपी लोक भेटतात जे चुकीचा सल्ला देतात, दिशाहीन करतात। पण कधी अक्षरांना सूर्यप्रकाश दिसला तसा आपल्याला ही चांगले जिवलग मित्र, लोक भेटतात, जे रक्ताच्या नात्याही पलीकडे असतात. जणू आशेचा किरण दाखवत....

         थंडी, दवबिंदू पासून बचाव करण्यासाठी पत्राच्या घरच्यांनी गोलाकार उकारांनी, वेलांट्यानी आधार द्यायचा प्रयत्न केला, पण कितीकाळ? त्यांनाही एकाक्षणी साथ सोडावी लागते.... आपलं पण असंच होतं...
       कधी कोणी जिवलग साथ सोडून जातो तर कधी कोणी जिवलग साथ सोडून देतो.......
     
        आयुष्य हे जणू रंगमंच, प्रत्येकाची आपली एक भूमिका, ती पार पडली की निघणं भाग आहे.. पण नाटक संपेपर्यंत पडदा पडे पर्यंत, आपली भूमिका आपल्याला निभवावी लागते, आणि पुन्हा निघावं लागतं पत्रासारखच, राहिला तो मजकूर पोहचवण्यासाठी , एकटंच, आपल्या स्वत्वाच्या प्रवासासाठी, येणाऱ्या अडचणींवर मात करत,  अनुभव पदरात घेत, शिकत..  सारं एकटंच.......


With reference to-
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1421601837925078&id=100002258272620


---- Namrata Khaire